Tuesday, April 23, 2024

4. डॉ. भाऊ दाजी लाड (1824-1874)




रामचंद्र उर्फ भाऊ दाजी लाड यांचे सर्व शिक्षण मुंबईत झालं. विद्यार्थीदशेत ते अतिशय हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात. आणि अनेक पारितोषिकांचे ते मानकरी ठरले. पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर (1843) त्यांनी दोन वर्षे मुंबईच्या एल्फिन्टन कॉलेजमध्ये विज्ञानाचे शिक्षक म्हणून काम केले. पुढे 1845 मध्ये ग्रँड मेडिकलची स्थापना झाली तेव्हा भाऊ दाजींनी आपली शिक्षकाची नोकरी सोडून दिली आणि ग्रँड मेडिकल कॉलेजमधे विद्यार्थी म्हणून त्यांनी प्रवेश घेतला. आणि 1850 वैद्यकीय पदवी मिळवणाऱ्या पहिल्या सन्माननीय डॉक्टरांमधले भाऊ दाजी हे एक होते.  त्यानंतर लगेचच ग्रँड मेडिकल कॉलेजमध्येच त्यांनी काही काळ सब असिस्टंट सर्जन आणि दुय्यम अध्यापक म्हणून काम केले. पुढे त्यांनी स्वतंत्र वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. वैद्यकीय व्यवसायात भाऊंनी अतिशय लौकिक कमावला. या काळात मुंबईतील एक विख्यात धन्वंतरी म्हणून ते ओळखले जात असतात.
वैद्यकीय संशोधनाचा पाया त्यांनी इथे घातला. महारोगावरील औषधाचा शोध त्यांनी लावला.
अनिष्ट रूढी परंपरा यांना विरोध करून समाज सुधारणेचा प्रयत्न त्यांनी केला. सामाजिक प्रश्नाबाबत त्यांचा दृष्टिकोन अत्यंत पुरोगामी होता.
समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा यांचा त्याग केल्याशिवाय आपल्या लोकांच्या सध्याच्या परिस्थितीत सुधारणा होणार नाही असे त्यांचे मत होते.

भाऊ इंग्रजी राजवटीचे समर्थक होते. अर्थात त्यावेळच्या परिस्थितीला अनुसरूनच त्यांची ही भूमिका होती. इंग्रजी राजवटीमुळे आपल्या लोकांना प्रगतीचे दारे उघडली जात आहेत, असे त्यांचे प्रामाणिक मत होते. इंग्रजी स्वतःचे समर्थन करत असताना भाऊ दाजींनी भारतीय जनतेच्या हिताकडे मात्र दुर्लक्ष होऊ दिले नाही. उलट येथील लोकांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत असे आग्रह धरून बरेच प्रयत्न  त्यांनी केले.

भाऊ दाजींनी विधवा विवाहाचे उघड समर्थन केले. तसेच ते शिक्षण स्त्री शिक्षणाचे पुरस्कार होते.

तत्कालीन नवसुधारकांमधले भाऊ दाजी लाड हे देखील एक महत्त्वाचे नेते होते. वैद्यकीय व्यवसाय सांभाळत समाजातील विविध क्षेत्रात सुधारणा करण्याचे प्रयत्न भाऊ दाजी यांनी केले.

आपल्या वैद्यकीय व्यवसायाकडे केवळ व्यवसाय म्हणून न पाहता, समाजसेवेचे माध्यम म्हणून पाहिले.  समाजातील गोर गरीब, निराधार लोकांना मोफत औषध उपचार केले  केले. मोफत दवाखाने उघडले.
मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी शाळा उभारणीत सहभाग घेतला.

इंग्रजी प्रशासनात  ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या तुलनेत अधिकाऱ्यांना हिंदी अधिकाऱ्यांना कमी महत्व दिले जात असे त्या विरुद्ध त्यांनी आवाज उठवला. त्यासाठी 1852 मध्ये स्थापन झालेल्या बॉम्बे असोसिएशन मध्ये ते सहभागी होते.

बॉम्बे असोसिएशन प्रमाणे हिंदी जनतेच्या हितासाठी सनदशीर मार्गाने कार्य करण्याचे उद्देशाने निर्माण आलेल्या ईस्ट इंडिया असोसिएशन या संघटनेतही भाऊंचा महत्त्वाचा सहभाग होता. हिंदी लोकांच्या आर्थिक समस्यांचा विचार करणे आणि त्या प्रश्नावर इंग्लंडमधील लोकमत, आपणास अनुकूल करून घेणे; हे तिचे प्रमुख उद्दिष्ट होते. 1859 मध्ये ब्रिटिश सरकारने भारतातील व्यापारी उद्योगधंदे यावर कर बसवणारे एक विधेयक तयार केले होते (लायसन्स बिल). यामुळे भारतातील उद्योग आणि व्यापार यावर अनिष्ट परिणाम होणार होता.  या विरोधकाचा निषेध करण्यासाठी मुंबईत एक सभा बोलवली गेली होती या सभेत भाऊ दाजी सक्रिय सहभागी होते.

1894 मधे स्थापन झालेल्या ज्ञानप्रसारक सभेमधे भाऊ दाजींही सामील होते.

मुंबई इलाख्याच्या बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सभासद म्हणून भाऊंची नेमणूक झाली होती.

तसेच मुंबई विद्यापीठाचे फिलो म्हणूनही त्यांची नेमणूक झाली होती.

इंग्रजी इतिहासकारांनी भारताचा इतिहास लिहायला सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या लेखनातील चुका भाऊंनी दाखवून दिल्या. तसेच रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकामधे त्यांनी अनेक इतिहासपर अनेक लेख लिहिले. गुप्तकाल खंडावर त्यांचा विषेश अभ्यास होता. नाणी, शिलालेख, ताम्रपट यांवर त्यांचा अभ्यास होता.

ग्रँट मेडिकल  सोसायटीचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले.

मुंबईच्या नगरपाल पदावर त्यांची दोनदा नियुक्ती केली गेली होती.

1855 च्या अँग्लो अफगाण युद्धात मृत्यूमुखी पडलेल्या हिंदी सैनिकांच्या कुटुंबियांसाठी मदत करण्यासाठी त्यांनी एक वेगळा निधी जमवला होता.

तसेच मादक पदार्थांच्या सेवनाविरुद्ध मोहिम उघडण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता.
---

No comments:

Post a Comment