Monday, February 14, 2022

अफगाणिस्तानच्या निमित्ताने

 शीतयुद्ध काळात अमेरिका अन रशिया यांतील सत्तासंघर्षामधे अनेक देश बळी पडले। त्यातून जिथे विवेकी आणि विचारी राज्यकर्ते व तत्वज्ञ नव्हते, जिथे धर्मांधता, आधुनिक तंत्र-मुल्य-विचार यांकडे डोळसपणे बघणं नव्हतं अशा अनेक राष्ट्रांचा गैरफायदा अमेरिका रशिया दोघांनी घेतला।

अनेक आफ्रिका आशियातील देश याला बळी पडले।

पण भारत, इजिप्त, इस्राएल, जपान यासारखे देश वेगळे राहिले। भारताने स्विकारलेला अलिप्ततावाद आणि अलिप्त राष्ट्र संघटेनेची उभारणी हा फार फार महत्वाचा मुद्दा हल्ली विसरला जातो। नवस्वतंत्र भारताला आर्थिक मदत हवी होती तंत्रज्ञानाची मदत हवी होती। ही घेताना परराष्ट्राचे वर्चस्व मात्र नको होते। याचसाठी नेहरुंनी अलिप्तराष्ट संघटना इजिप्त आणि इतर राष्ट्रांच्या सोबतीने उभी केली। यातील बहुसंख्य देशांनी आपले आधुनिकीकरण, औद्येगिकरण बरेचसे यशस्वी केले। याच मुळ् या देशांतील लोकशाही टिकली वाढीस लागली स्थिरावली।

आणि या सर्वांमागे भारतासंदर्भात धर्मनिरपेक्षता नक्कीच उपयोग पडली। अन्यथा छोटेछोटे तुकडे असलेला दुसरा युरोप व्हायला वेळ लागला नसता।

मुळात भारत म्हणून एकसंध असा एक बंध भारताला नाही। तरीही भारत टिकून राहिला तो आपल्या सर्वसमावेशक अशा राज्यघटनेमुळे आणि तिचा योग्य अर्थ अन मान ठेवणाऱ्या राज्यकर्त्या अन प्रशासकांमुळे। यांनीही चुका केल्या। अगदी आणिबाणीसारखी घोर चूक केली। तरीही देशाचे देश म्हणून अस्तित्व, एकसंध अस्तित्व अबाधित राखले। इथली दुफळी मिटवायचा प्रयत्न केला।

हे कितीही दुर्लक्षित केलं तरी नाकारता येण्यासारखं नाही। भले आपला देश इंग्लंड झाला नाही, अमेरिका झाला नाही। पण आपला देश पाकिस्तान वा इराण वा इराक वा अफगाणिस्तानही झाला नाही। याचे भान आपण विसरतो आहोत।


आज अफगाणिस्तान बाबत कोणाही भारतीयाने बोलताना लिहिताना प्रचंड सावध असलं पाहिजे। अफगाणिस्तान अन आपल्या सीमा यांतली समीपता ही कधीही ओलांडली जावू शकते। आपण आपल्या धर्म संस्कृतीचा जितका डांगोरा पिटू तितका तालिबान जास्त आक्रमक होऊ शकतो। तालिबानची शक्ती फार कमी लेखू नये। 

रशियाने जवळजवळ पूर्ण अफगाणिस्तान गिळंकृत करूनही तालिबान तगले।

पुढे १० वर्ष नाकावर टिचून अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानात राहिलं। अखेर अगदी ट्रंपसारख्या आक्रमक अमे अध्यक्षालाही पाऊल मागे घ्यावं वाटलं। 

आणि गेल्या ४-५ महिन्यातली त्यांची घोडदौड पहाता भारतीयांनी जपूनच रहायला हवं। 

याच भान बिजेपी सरकारलाही आहे म्हणूनच याच काळात काश्मीरवासियांना पुन्हा जवळ केलं जातय।

सामान्य माणूस म्हणवन हे भान आपल्यालाही हंवं। वरवरच्या बातम्या आणि आंतरराष्ट्रीय राजकारण यातली दरी समजली तर हे नक्की कळू शकेल