Thursday, August 1, 2024

सोनोपंत दांडेकर

(संकलनपर)

 (२० एप्रिल १८९६ — ९ जुलै १९६८). महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाचे विख्यात भगवत भक्त, श्री सार्थ ज्ञानेश्वरीचे संशोधक, संपादक आणि संतवाड्.मयाचे अभ्यासक. त्यांचे मूळ नाव शंकर वामन दांडेकर असून ते सोनोपंत उर्फ मामासाहेब दांडेकर या नावाने अधिक परिचित होते.

मूळचे माहिमचे पम नंतर पुण्यात. फर्गसन महाविद्यालयातून बीए. पुढे प्लेटोचे तत्वज्ञान यावर एम ए.

शिक्षण प्रसारक मंडळी चे आजीव सदस्य. पुढे सप महाविद्यालयात तत्वज्ञानाचे प्राध्यापक.

भारतीय,पाश्चात्य दोन्ही तत्वज्ञानांचा प्रचंड अभ्यास.ज्ञानेश्वरीचे संशोधक, संपादक. संत वाड्मयाचा अभ्यास. डॉ राधाकृष्णन यांनीही त्यांच्या ज्ञान अन अभ्यासाचे कौतुक केलेले. 

नंतर नू म विचे मुख्याध्यापक. नंतर रुईयात उप प्राचार्य. अन नंतर स प मधे प्राचार्य.

प्रसाद मासिकाचे काही काळ संपादक. भारतीय.तत्वज्ञान परिषदेचे अध्यक्ष. 

पंढरपूरची वारी नेमाने करत. निवृत्ती नंतर नेवासे इथली ज्ञानेश्वरांच्या मंदीराचे पुनरुज्जीवन. ज्ञानदेवांच्या पैस भोवती मोठे देऊळ बांधले. अनेक देवळांचे पुनरुज्जीवन,डागडुजी. 


ज्ञानेश्वरीची अर्थासह संशोधित आवृत्ती काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारतर्फे सोनोपंतांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. यान्वये तयार झालेल्या सार्थ ज्ञानेश्वरी मधली त्यांची प्रस्तावना फार मोलाची.

गावोगावी कीर्तने-प्रवचने करून सर्वसामान्य लोकांना नीतिधर्माचा उपदेश करून त्यांना अंधश्रद्धामुक्त असा सन्मार्गाचा रस्ता दाखविला. शिवाय त्यांनी ज्ञानेश्वरी, नामदेव गाथा, भावार्थ रामायण इत्यादी संत-साहित्य संशोधित करून शुद्ध स्वरूपात लोकांपुढे ठेवले.

ज्ञानेश्वरी, बरोबरच नामदेव गाथा, भावार्थ रामायण इत्यादी संत-साहित्य संशोधित करून शुद्ध स्वरूपात लोकांपुढे ठेवले. ज्ञानदेव आणि प्लेटो, ईश्वरवाद, अध्यात्मवादाची मूलतत्त्वे, अभंग-संकीर्तन—भाग १,२,३, ज्ञानदेव चरित्र, वारकरी पंथाचा इतिहास, गीतेच्या श्लोकावर प्रवचने, जोग महाराजांचे चरित्र इ. मौलिक ग्रंथ लिहिले.

धार्मिक ग्रंथांची पारायणे करण्यापेक्षा त्यातले विचार आचरणात आणा; धर्माला अध्यात्माची जोड द्या; धर्म म्हणजे आत्मधर्म, तो साधण्यासाठी भक्तिप्रधान, उदार भागवतधर्माची गरज आहे, असे विचार त्यांनी मांडले.

महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाच्या अंतःकरणात प्रेमादराचे स्थान मिळविले. जुन्या परंपरा आणि नव्या कल्पना यांमध्ये भावभक्तीचा जिवंत जिव्हाळा निर्माण करून त्यांची सोनोपंतांनी सोज्ज्वळ सांगड घातली.

संतांचा धर्म आणि विद्यमान अणुयुगाचे मर्म यांचा समन्वय त्यांच्या विचारात, उक्तीत आणि वृत्तीत आढळतो. भक्तिमार्गाला अद्ययावत शास्त्रशुद्ध कल्पनांची जोड देऊन सोनोपंतांनी या पंथाला व्यापक, नित्य, नवे, चैतन्ययुक्त आणि बुद्धिप्रामाण्यवादी रूप दिले.

तत्त्वज्ञान, अध्यात्म हे ग्रंथांत ठेवावयाचे विषय नाहीत. ते सरळ, सोप्या भाषेत जनसामान्यांपर्यंत पोचविण्याचे कार्य सोनोपंतांनी जन्मभर केले. पाश्च्यात्त्य आणि भारतीय तत्त्वज्ञानाचा तुलनात्मक अभ्यास त्यांनी केला. त्याचे फलित म्हणजे त्यांचा प्लेटो व ज्ञानेश्वर यांच्यावरील ज्ञानदेव आणि प्लेटो हा तुलनात्मक ग्रंथ होय.

No comments:

Post a Comment